Ad will apear here
Next
शेतकऱ्यांना खूशखबर; विनातारण कृषिकर्जाच्या मर्यादेत वाढ

मुंबई : अर्थसंकल्पापाठोपाठ रिझर्व्ह बँकेनेही शेतकऱ्यांना खूशखबर दिली आहे. बँकेने द्वैमासिक पतधोरणात शेतकऱ्यांसाठी विनातारण कृषिकर्जाच्या रकमेत सुमारे ६० हजार रुपयांची वाढ केेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक लाखाऐवजी एक लाख ६० हजार रुपये कर्ज विनातारण मिळणार आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास
रिझर्व्ह बँकेने गुरुवारी, सात फेब्रुवारी २०१९ रोजी जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणात हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आठवड्याभरात दुसऱ्यांदा खूशखबर मिळाली आहे. या निर्णयाने जवळपास १२ कोटी अल्प भूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. २०१० मध्ये शेतकऱ्यांच्या बिनव्याजी कर्जाची रक्कम एक लाख इतकी निश्चित करण्यात आली होती. आता त्यात चांगली वाढ झाली आहे. 

शेतीसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात झालेली वाढ आणि चलनवाढ यांचा विचार करून ही कर्ज मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अल्प-भूधारक शेतकऱ्यांना फायदा होईल. या संदर्भातील आदेश लवकरच जारी करण्यात येतील, असे रिझर्व्ह बँकेच्या निवेदनात म्हटले आहे. 

याशिवाय शेती संबधित कर्जाचे प्रश्न सोडविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक अंतर्गत कामकाज समिती नेमण्याचे ठरवले असून, यामुळे पत व्यवस्थेची व्याप्ती छोट्या शेतकऱ्यांपर्यंत वाढवणे शक्य होईल. प्रादेशिक भिन्नतेनुसार दीर्घकालीन कृषी कर्जाच्या अडचणी वेगवेगळ्या असतात. त्यावर उपाययोजना आणि धोरणनिश्चितीसाठी ही समिती काम करेल, असेही  रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZVIBX
Similar Posts
रिझर्व्ह बँकेची दिवाळी भेट; रेपो दरात पाव टक्का कपात मुंबई : सणासुदीच्या काळात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्का कपात करून सर्वसामान्य ग्राहकांना दिवाळी भेट दिली आहे.
एनईएफटी, आरटीजीएस होणार निःशुल्क; रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने अपेक्षेप्रमाणे रेपो दरात आणि रिव्हर्स रेपो दरात प्रत्येकी पाव टक्का कपात केली असून, एनईएफटी आणि आरटीजीएस व्यवहारांवरील शुल्कही रद्द केले आहे. आता नवा रेपो दर ५.७५ टक्के असून, नवा रिव्हर्स रेपो दर ५.५० टक्के झाला आहे. यामुळे बँका गृहकर्जांचे व्याजदर घटवण्याची अपेक्षा आहे
रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पाव टक्का कपात मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. रेपो दर ६.२५ वरून सहा टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे गृह, वाहन तसेच अन्य कर्जे स्वस्त होणार असून, कर्जदारांच्या मासिक हप्त्यात घट होण्याची शक्यता आहे.
रेपो दरातील कपातीचे रिअल इस्टेट क्षेत्राकडून स्वागत मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेल्या पाव टक्के कपातीमुळे गृहकर्जे स्वस्त होतील, तसेच रोखीची कमतरता दूर होईल, परिणामी रिअल इस्टेट क्षेत्रात खरेदीला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language